आता दोन भारत आहेत एक अतिशय श्रीमंतांचा भारत आणि दुसरा गरीबांचा. या दोन्ही भारतांच्या दरम्यानची दरी दिवसेंदिवस वाढत आहे, असं वक्तव्य करत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलं होतं. बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. दरम्यान, राहुल गांधी यांच्या या दोन भारताबद्दलच्या वक्तव्यावरून भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला असून त्यांना प्रत्युत्तर दिलंय. हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे.
“राहुल गांधींना एका भारतात दोन भारत दिसणे स्वाभाविक आहे. कारण ते दोन संस्कृतींमध्ये वाढलेले आहेत; त्यांच्या आई सोनिया गांधी इटालियन असून वडील राजीव गांधी हे भारताचे होते. त्यामुळे ते इटली आणि भारताच्या संस्कृतीत वाढले. परिणामी त्यांच्या विचारांमध्ये नेहमीच संघर्ष होत असतो,” असं विज यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
राहुल गांधी को एक भारत में दो भारत नजर आना स्वाभाविक है क्योंकि उनका पालन पोषण दो संस्कृतियों में हुआ है मां सोनिया गांधी इटालियन थी और पिता राजीव गांधी भारत के थे । इटली और भारत की संस्कृति में पल कर बड़े हुए हैं वह । उनकी सोच में हमेशा द्वंद रहा है।— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) February 3, 2022
राहुल गांधी को एक भारत में दो भारत नजर आना स्वाभाविक है क्योंकि उनका पालन पोषण दो संस्कृतियों में हुआ है मां सोनिया गांधी इटालियन थी और पिता राजीव गांधी भारत के थे । इटली और भारत की संस्कृति में पल कर बड़े हुए हैं वह । उनकी सोच में हमेशा द्वंद रहा है।
राहुल गांधी काय म्हणाले होते?
“रोजगार, लघू आणि मध्यम उद्योग आणि असंघटीत क्षेत्रात याची निर्मिती झाली. या क्षेत्रातून कोट्यवधी रुपये हिसकावून घेत तुम्ही देशातल्या मोजक्या श्रीमंतांना दिले. गेल्या सात वर्षात तुम्ही लघू आणि मध्यम उद्योगांवर आक्रमण केलंय. नोटाबंदी, त्यापाठोपाठ जीएसटी आणि करोनाकाळात त्यांना तुम्ही कोणतीच मदत केली नाही. लोकांच्या उत्पन्नात घट झाली असून गरीबांची संख्या वाढत आहे. युपीए सरकारने १० वर्षात २७ कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढलं होतं. मोदी सरकारने २३ कोटी लोकांना परत गरिबीमध्ये ढकललं आहे, असा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे सर्वच क्षेत्रात अंबानी आणि अदानी दिसतात. छोटे उद्योग तुम्ही मारून टाकलेत, असं ते म्हणाले होते.